आठवण...






आठवण...

        आठवण त्याची येते जी  व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. जिच्या असण्याने आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो. मग त्या व्यक्तीसोबतची छोटी गोष्टसुद्धा आनंद देते.. त्या व्यक्तीचा सहवास हवा हवासा वाटतो. सोबत घालवलेला प्रत्येक क्षण सुखद वाटतो.  त्या व्यक्तीसाठी सगळं करावं वाटत, आपल्याला झालेला आनंद  कधी एकदा त्या व्यक्तीला सांगतो असं होऊन जात....आणि असं तेव्हाच होत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी खूप खास असते, आपलं सगळं काही असते. मग अशा व्यक्तीची खूप दिवस जर भेटच झाली नाही तर कधी  एकदा  त्या व्यक्तीला आपण  पाहतो, भेटतो असं होऊन जात.. आणि ह्याच भावनेला आपण  प्रेम असं नाव देतो.

    " शब्द माझे,आठवण तुझी..

       विचार माझे,भास तुझा..

       मन माझे,वास तुझा..

       स्वप्न माझं,ध्यास तुझा

       आणि फक्त तुझ्याच.."

          अशी असते आठवण.. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात सामावून घेते एखाद्याला आणि मग किती दूर जावं वाटलं तरी जाता येत नाही.  एवढी एखादी व्यक्ती आपली होऊन जाते..  खरंच कोणाची तरी आठवण खूप खास असते, गोड असते... प्रत्येकालाच आपली एक खास अशी आठवण असते;आपल्या खास व्यक्तीची..

      प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी तरी असं खास असत ज्याच्या आठवणीने मन आनंदून जातं.  चेहऱ्यावर गोड हसू उमटत..

                                       

           - मराठी लेखणी

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या